बुधवार, १० जून, २००९

॥श्री गणेशा॥

आज माझ्या ब्लॉगचा मी शुभारंभ करतेय. खूप छान वाटतंय. मी कधी लिहीन वगैरे असं वाटलं नव्हतं. म्हणजे शाळेत असताना माझ्या निबंधांचं कौतुक व्हायचं किंवा एखाद्या कवितेचं रसग्रहण वगैरे बर्‍यापैकी जमायचं. पण परिक्षेची तयारी यापलीकडे जाऊन त्याचा कधी विचार केला नाही.
परंतु मध्यंतरी एक प्रसंग घडला ज्यामुळे डोक्यात अनेक विचारांची गर्दी झाली आणि शेवटी न रहावून ते सगळं कागदावर उतरवलं. सुरुवातीला ते माझ्यापुरतंच ठेवायचं ठरवलं होतं. पण जरा धीर करून नवर्‍याला, सासू-सासर्‍यांना दाखवलं आणि त्यांच्याकडून इतका छान प्रतिसाद मिळाला म्हणून सांगू! मग माझा उत्साह वाढला आणि आता जेव्हा जमेल तेव्हा व चांगला विषय सुचेल तेव्हा लिहायचं असं ठरवून टाकलं!
जेव्हा माझी आई, भाऊ आणि प्राजक्ता, माझी मैत्रीण यांनी तो लेख वाचला तेव्हा त्यांनी मला सुचवलं की तू ब्लॉग का लिहीत नाहीस? तुला जमेल. तोपर्यंत माझ्या डोक्यातही आलं नव्हतं की आपण ब्लॉग वगैरे सुरु करावा. पण मग सिरियस्ली विचार करु लागले आणि आज विचार पक्का झाल्यावर तुम्हा सगळ्यांसमोर माझे विचार या ब्लॉगच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं.
शांत पाण्यात एखादा खडा टाकल्यावर कसे त्यावर तरंग उठतात, तसंच आपल्या विचारांच आहे असं मला वाटतं. म्हणून ब्लॉगचं नाव 'तरंग'. आपल्या आयुष्यात एखादा प्रसंग घडतो, जो आपल्याला विचार करायला उद्युक्त करतो. आपल्या मनात एकदा का विचार यायला लागले ना की ते वेड्यासारखं कुठेही धावू लागतं. कधी कधी हे विचार इतके अस्वस्थं करतात की ते नुसते आपल्यापुरते ठेवणं अशक्यं होतं. कुणाबरोबर तरी शेअर करावसं वाटतं. विचारांना वाट मोकळी करून द्यावीशी वाटते. म्हणून हा सगळा खटाटोप!
ज्या लेखामुळे मला हा ब्लॉग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, तो लेख हे या ब्लॉगवरचं पुढचं पोस्ट असेल. आशा करते की तुम्हाला ते आवडेल.
आपलं सहकार्यं, प्रोत्साहन आणि प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.............................
श्रेया बापट.

३ टिप्पण्या:

  1. lekh mast jamlay.wachlyabarobar lagech tula compliments detey. Aata kadhihi kahi suchala ki lagech lihit ja. Tu kharach asa kahi lihishil asa mala pan watla navata. Aga mukhya mhanje babani pan wachlay ani tula best of luck sangitla aahe.

    उत्तर द्याहटवा
  2. hi shreya
    ur mom gave me ur id and i got a chance to read it. I do think the same way as u do but d people around us do not think the same way!
    everybody wants a change but nobody wants to change! I think because it is the way we all r made! our parents teach us to adjust to the surroundings but they never force us to change and accept the change around u by the same way! anyway it was a nice beginning for ur blog;
    all the best!
    neetatai

    उत्तर द्याहटवा
  3. Hi Neeta tai,Thanks vey much for reading my blog and also for your comments!!

    उत्तर द्याहटवा